महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचा देश....!
महाराष्ट्र हा डोंगरांचा देश, दुर्गांचा देश. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचे वर्णन कसे केले आहे?
'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा'
अशा या राकट देशाचा प्रतिनिधी म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीत कोठेही उभे राहून नजर फिरवली तर, दर चार-दोन शिखरांआड एखादं शिखर तटबुरुजांचं शेला-पागोटे चढवून उभं राहिलेलं आढळतं. यातील बहुतेक दुर्गांनी श्रीशिवछत्रपतींची चरणधूळ आपल्या मस्तकी धारण केली आहे. त्या शिवस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची धारातीर्थे आहेत. या गड-कोट-किल्ले अन् दुर्गांमधून इये देशीचे पुत्र ताठ मानेने वावरले आहेत. या बळीवंत दुर्गांच्या आधारावरच शिवरायांनी परकीय, आक्रमक, धर्मांध सत्ताधीशांना नामोहरम केलं आणि
या भूमंडळाचे ठायी , धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे
हे समर्थ वचन सार्थ केले. दुर्ग म्हणजे काय? त्याचे प्रकार किती? महाराष्ट्रात असे किती दुर्ग आहेत? ते कुठे आहेत? तिथे पोचायचे कसे? गड किल्ले कसे पहायचे?त्यांचे महत्त्व काय? आजची त्यांची स्थिती कशी आहे? असे अनेक प्रश्न आपल्यासमोर येतात. त्यांची अभ्यासपूर्ण परंतु थोडक्यात माहिती प्रा. प्र.के. घाणेकर यांच्या सौजन्याने या विभागात दिलेली आहे. चला तर पाठीवर एक पिशवी, भक्कम बूट,बरोबर खाण्याचे काही पदार्थ आणि पाणी घेऊन गड-किल्ले सर करूयात!
किल्ला म्हणजे काय?
जिथे राहून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येते, वेळप्रसंगी शत्रूवर हल्ला करता येतो आणि नैसर्गिक किंवा मुद्दाम बांधकाम करून दुर्गम केलेल्या ठिकाणी राहिल्यामुळे आपले संरक्षण होते त्याला किल्ला असे म्हणतात. किल्ले ही लढायांची ठिकाणं. रणक्षेत्रांचे हे मानकरी म्हणजे स्वातंत्र्यात्मा सह्याद्रीची आभूषणेच आहेत. या किल्ल्यांचा परिचय महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्यकाने करून घ्यायला हवा. महाराष्ट्रात आहेत तसे आणि तितके किल्ले जगात अन्यत्र नाहीतच. दोन हजार वर्षांपूर्वीच्या सातवाहन राजवंशापासून ते राष्ट्रकूट, चालुक्य शिलाहार, यादव, कदंब, बहमनी, मोगल, दक्षिणी पातशाह्या, मराठे, पेशवे, हबशी, पोर्तुगीज, डच,इंग्रज अशा वेगवेगळया काळातल्या वंश - धर्माच्या सत्ताधीशांनी या देशात किल्ले बांधले.
किल्ला, गड, कोट असे देशी भाषेत ज्याला म्हटले जाते त्याला दुर्ग असे संस्कृत नाव प्रचलित आहे. महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. संरक्षक तटबंदीने युक्त आश्रयस्थान म्हणजे दुर्ग किंवा किल्ला होय. विशेषत: शत्रूला जिथे प्रवेश करणे कठीण असते असे स्थान (दुर् + ग)अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे. त्यांचे मुख्य प्रकार - धनुदुर्ग, महिदुर्ग, अपदुर्ग (जलदुर्ग), नृदुर्ग, गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला) असे याचे काही महत्त्वाचे प्रकार आहेत.
किल्ल्यांचे महत्व
गडकोट, किल्ले आणि दुर्ग ही संघर्षाची प्रतिके. शत्रूशी लढण्यासाठी या किल्ल्यांचा आधार घेतला जाई. ज्याच्या हाती अधिक किल्ले तो राजा आपल्या प्रजेचे जास्त चांगले संरक्षण करू शकत असे अशी शिवाजी महाराजांच्या काळी परिस्थिती होती. आपल्या पूर्वजांनी प्राणांची बाजी लावून हे गड जिंकले व शत्रूंशी ते झुंजले. महाराष्ट्राची स्वतंत्र भूमी तयार होण्याआधी शौर्याचा एक मोठा इतिहास या किल्ल्यांनी पाहिलेला आहे. त्याकाळी स्वसंरक्षणासाठी महत्व असलेले किल्ले आज आपल्या इतिहासाची, आपल्या पूर्वजांच्या शौर्याची सोनेरी पाने म्हणून आपल्याला तितकेच महत्वाचे आहेत.
आज महाराष्ट्रातील किल्ले पहायला गेले तर सगळी अवकळाच दिसते. चांगल्या परिस्थितीत असलेले तट, बुरूज आढळत नाहीत. याउलट उत्तरभारतातील किल्ले मात्र सुंदर बांधकामे, देखणी तटबंदी यांनी नटलेले दिसतात. जुलमी-परकीय आक्रमकांशी या किल्ल्यांच्या मूळ मालकांनी स्वाभिमानशून्य तडजोडी केल्यामुळे हे किल्ले शाबूत राहिले. याउलट स्वातंत्र्याच्या आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातले किल्ले कोणतीही तडजोड न करता झगडत राहिले. त्यामुळेच आजला ते किल्ले म्हणजे पडक्या वास्तू आहेत. असे असले तरी ते आपली स्फूर्तिस्थाने आहेत.
किल्ल्यांचे प्रकार
रामायण, महाभारत, अग्नीपुराण, कौटिल्याचे अर्थशास्त्र, ऋग्वेद, अग्नीपुराण,अथर्ववेद,वराहमिहिराची बृहत्संहिता , मनुस्मृती अशा जुन्या ग्रंथात किल्ल्यांचे महत्व दिलेले आढळते. म्हणजे त्याही काळात आपल्या देशात किल्ले होतेच.
प्रथमं गिरीदुर्गंच , वनदुर्गं द्वितीयकम्
तृतीयं गव्हरं दुर्गं, जलदुर्गं चतुर्थकम्
पंचमं कर्दमं दुर्गं, षष्ठं स्थान्मिश्रकं
सप्तमं ग्रामदुर्गं स्यात कोष्टदुर्गं तथाष्टकम्
- देवज्ञविलास, लाला लक्ष्मीधर
लाला लक्ष्मीधराने देवज्ञविलास या ग्रंथात किल्ल्यांचे आठ प्रकार सांगितले आहेत. त्यातील सर्वात उत्कृष्ट गिरिदुर्ग - म्हणजे डोंगरी किल्ला, त्यानंतर वनदुर्ग म्हणजे अरण्यात असलेला किल्ला. गव्हरं म्हणजे एखाद्या गुहेचा उपयोग किल्ल्यासारखा करता आला तर तो तिस-या श्रेणीचा किल्ला मानला जातो. चौथ्या दर्जाचा किल्ला म्हणजे जलदुर्ग - पाण्यातला किल्ला. कर्दमं म्हणजे चिखलात किंवा दलदलीच्या प्रदेशातील किल्ला हा पाचव्या प्रतीचा तर मिश्रपध्दतीचा किल्ला म्हणजे सहाव्या प्रतीच किल्ला. संपूर्ण गावकुस किंवा गावाभोवती कोट असेल तर तो सातव्या प्रकारचा किल्ला व एखादा नुसता कोट किंवा गढी हा आठव्या प्रकारचा किल्ला.
महाराष्ट्रातील किल्ले
बीड जिल्हा
- धर्मापुरीचा किल्ला
अकोला जिल्हा (१)
- अकोला किल्ला (असदगड)
अमरावती जिल्हा (१)
- गवळीगड (गाविलगड)
अहमदनगर जिल्हा (३)
- भुईकोट किल्ला
- बहादूरगड
- रतनगड
- खर्ड्याचा किल्ला
उस्मानाबाद जिल्हा (२)
परंडा हा किल्ला भुईकोट किल्ला आहे.या किल्ल्यावर लढाई न झाल्यामुळे त्याला रंडका किल्ला म्हटले जाते.औरंगाबाद जिल्हा (९)
- अंतुर किल्ला
- जंजाळा किल्ला/वैशागड
- तलतम गड
- देवगिरी (दौलताबाद)
- भांगशीमाता गड
- महादेव टाक किल्ला (लोंझा किल्ला)
- लहूगड
- वेताळगड किल्ला (वाडीचा किल्ला)
- वैशागड/जंजाळा किल्ला
- ९. सुतोंडा
रायगड जिल्हा (३२)
- अवचितगड
- उंदेरी
- कर्नाळा
- कुलाबा
- कोथळीगड (पेठचा किल्ला)
- कोरलई
- कौला किल्ला॑
- खांदेरी
- घोसाळगड
- चंदेरी
- तळेगड
- तुंगी
- ढाक
- पदरगड
- पेब
- प्रबळगड
- बिरवाडी
- भिवगड
- मंगळगड (कांगोरी)
- मलंगगड
- माणिकगड
- मानगड॑
- रतनगड
- रायगड
- लिंगाणा
- विशाळगड
- विश्रामगड
- सांकशी
- सागरगड
- सुरगड
- सोनगिरी
- सोनडाई
कोल्हापूर जिल्हा (८)
गोंदिया जिल्हा (१)
चंद्रपूर जिल्हा (२)
३) माणिकगड ४) भद्रावती किल्ला ५) लोहगड ६) चंदनखेडा किल्ला ७) गोंड राज्याचा किल्लाजळगाव जिल्हा (४)
ठाणे जिल्हा (३९)
- अर्नाळा
- अलिबाग
- अशीरगड
- असावगड
- इंद्रगड
- उंबरगांव
- कल्याणचा किल्ला
- कामनदुर्ग
- काळदुर्ग
- केळवे-माहीम
- कोंजकिल्ला
- गंभीरगड
- गुमतारा
- गोरखगड
- जीवधन
- टकमक
- ठाणे किल्ला
- डहाणू
- तांदुळवाडी किल्ला
- तारापूर
- धारावी
- दातिवरे
- दिंडू
- नळदुर्ग
- पारसिक
- बल्लाळगड
- बळवंतगड
- बेलापूर
- भवनगड
- भैरवगड
- भोपटगड
- मानोर
- माहुली
- वररसोवा
- वसईचा किल्ला
- शिरगांवचा किल्ला
- संजान
- सिद्धगड
- सेगवाह
धुळे जिल्हा (१)
नंदुरबार जिल्हा (१)
- अक्काराणीचा किल्ला (अक्राणीचा किल्ला)
नागपूर जिल्हा (६)
- आमनेरचा किल्ला
- उमरेडचा किल्ला
- गोंड राजाचा किल्ला
- नगरधन (रामटेक) (भुईकोट किल्ला)
- भिवगड
- सिताबर्डीचा किल्ला
नाशिक जिल्हा (३६)
- अंकाई
- अचलगड
- अंजनेरी
- अलंग
- अहिवंत
- इंद्राई
- कंक्राळा
- कंचना
- कण्हेरगड
- कऱ्हेगड
- कावनई
- कुलंग
- कोळधेर
- गाळणा
- घारगड किंवा गडगडा
- चांदोर
- जवळ्या
- टंकाई
- त्रिंगलवाडी
- त्रिंबक
- धैर
- धोडप
- पट्टा
- बहुळा
- ब्रह्मगिरी
- भास्करगड
- मार्किंडा
- मुल्हेर
- रवळ्या
- राजधेर
- रामसेज
- वाघेरा
- वितानगड
- हर्षगड
- हरगड
- हातगड
पुणे जिल्हा (२२)
पुणे जिल्ह्यात किमान २९ किल्ले आहेत. या सर्व किल्ल्यांना प्रत्यक्ष भेट देऊन आलेल्या संदीप मा. तापकीर यांनी ’महाराजांच्या जहगिरीतून...’ हे पुस्तक लिहिले आहे. तापकिरांनी आपल्या पुस्तकाची तालुकानिहाय मांडणी करून त्या त्या तालुक्यातल्या गडकोटांची माहिती नकाशे आणि छायाचित्रांसहित दिली आहे. या २९ किल्यांपैकी २२ किल्ल्यांची नावे याप्रमाणे :-- अणघई
- कुवारी
- घनगड
- चाकण
- चावंड
- जीवधन
- तिकोना
- तुंग
- नारायणगड
- नोरगिरी
- पुरंदर
- प्रचंडगड (तोरणा)
- मल्हारगड
- राजगड
- राजमाची
- विचित्रगड
- विसापूर
- लोहगड
- शिवनेरी
- सिंदोळा
- सिंहगड
- हडसर
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा (४२)
- अंजनवेल
- आंबोळगड (रत्नागिरी)
- आवर किल्ला
- कनकदुर्ग
- कुडाळचा किल्ला
- कोट कामते
- खारेपाटण
- गोवळकोट
- गोवा
- जयगड (रत्नागिरी)
- दुर्ग रत्नागिरी
- देवगड
- नांदोशी
- निवती
- पालगड (रत्नागिरी)
- पूर्णगड (रत्नागिरी)
- प्रचितगड (रत्नागिरी)
- फत्तेगड
- बाणकोट
- बांदे
- भगवंतगड
- भरतगड
- भवनगड
- भैरवगड
- मंडणगड
- मनसंतोषगड
- मनोहरगड
- महादेवगड
- महिपतगड (रत्नागिरी)
- यशवंतगड (रत्नागिरी)
- रसाळगड (रत्नागिरी)
- राजापूरचा किल्ला
- रायगड
- विजयगड (रत्नागिरी)
- विजयदुर्ग-घेरिया
- वेताळगड
- सर्जेकोट
- साठवली
- सावंतवाडीचा किल्ला
- सिंधुदुर्ग
- सुमारगड
- सुवर्णदुर्ग (रत्नागिरी)
सांगली जिल्हा (९)
सातारा जिल्हा (२८)
- अजिंक्यतारा
- कमळगड
- कल्याणगड (नांदगिरी)
- केंजळगड
- चंदन
- जंगली जयगड
- गुणवंतगड
- दातेगड/सुंदरगड
- नांदगिरी
- पाटेश्वर
- पांडवगड
- प्रचितगड
- प्रतापगड
- भैरवगड
- भूषणगड
- मकरंदगड
- मच्छिंद्रगड
- महिमंडणगड
- महिमानगड
- वासोटा
- सज्जनगड
- संतोषगड
- सदाशिवगड
- सुंदरगड
- वर्धनगड
- वंदन
- वसंतगड
- वारुगड
- वासोटा
- वैराटगड
सोलापूर जिल्हा (२)
यादीत समावेश नसलेले किल्ले
- खैराईगड
- मनमाडजवळचा गोरखगड
- देहेरगड
- आंबोलीजवळचा नारायणगड
- जुना पन्हाळा
- अचला
- कांचन
- मनमाडजवळचा कात्रा
- कोंढवी
- कोळदुर्ग
- कोळदेहेर
- खारेपाटण (सिंधुदुर्ग
- पालगड
- भवानीगड
- भास्करगड (नाशिक जिल्हा)
- कणकवलीजवळचा भैरवगड (सिंधुदुर्ग जिल्हा)
- कोथळ्याचा भैरवगड
- नरडव्याचा भैरवगड
- मेसणा
- मोरधन
- मोहनदर (नाशिक जिल्हा)
- रांजणगिरी
- राजदेहेर
- रामदुर्ग
- वाघेरा
- सदानंदगड (सिंधुदुर्ग जिल्हा)
- सिद्धगड (सिंधुदुर्ग जिल्हा)
- कणकवलीचा सोनगड (सिंधुदुर्ग जिल्हा)
- बांद्याजवळचा हनुमंतगड
0 comments:
Post a Comment